Saturday 25 January 2014

धुडगुस

उबग आलाय आता
समाजात पसरलेल्या धुडगुसाचा,
जिथे हात जोडावे
तिथे जोडले जात नाहीत
भलतीकडेच जोडावे लागतात!

मनात नसतांना स्मित येते लाचारीने
या लाचारिने व्यभिचार
शिष्टाचार ठरवला जात आहे…!

आता बापूजींच्या माकडांनी
डोळे उघडले पाहिजेत,
कानांनी आक्रोश ऐकुन
निर्भीडतेंने बोलले पाहिजे.
अन्यायाला वाचा फोडंत
माणुसकीला जागले पाहिजे…!

                           जगदीश गिरी.

No comments:

Post a Comment