Monday 29 April 2019

Morning walk.

"Morning Walk"

अर्थात प्रभात फेरी

 

प्रभात समयी फिरायला जाणे हे कायीक(शारीरिक) व मानसिक तंदुरुस्ती साठी  ("Physically and Mentally Fitnes")

अत्यंत फायदेशीर आहे हे सर्वश्रुत, सर्वज्ञात आहे. तरीही आपण दुर्लक्ष करतो. इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम उत्तम तर आहेच आणि तो सहजशक्य आणि सोपा आहे. या व्यायामासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज नाही, कुठल्याही साधनांची,

साहित्याची आवश्यकता नसते.

तरीही बरेच लोक फिरण्याचा कंटाळा करतात. कारण एकमेव सांगितले जाते की "आम्हाला वेळच मीळत नाही हो." पण लक्षात घ्या की, तुम्ही आता वेळ नाही दिला तर पुढेचालून शारीरिक दुर्बलता येईल, अनेकानेक आजाराना बळी पडावे लागेल. नैराश्य (Dispersion) येवून जीवन जगण्याचाच कंटाळा येईल.आपले नातलग, मित्रही आपल्याला कंटाळून जातील.

म्हणून वेळेचे कारण सांगत बसलात तर ती वेळ दवाखाना, डॉक्टर यांच्यासाठी द्यावी तर लागेलच आणि प्रचंड पैसाही खर्च करावा लागेल. मग ठरवाच एकदा की, पुढील पैसा, वेळ वाचवण्यासाठी. आता कंटाळा दूर करून रोज सकाळी लवकर उठून स्वत:साठी किमान एक तास वेळ देता येणार नाही काय? हा प्रश्न स्वत:च स्वतःला विचारा.

आता लवकर उठून फिरण्याचे किती आणि कसे फायदे आहेत तेही जरा पाहूयात. 

१) आपले शरीर निरोगी, तंदुरुस्त व चपळ रहाते,

२) दहा मिनीटात एक किलोमीटर या वेगाने झपझप चालल्यास श्वासोच्छ्वास वेगाने होतो आणि शरीरास शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर प्रमाणात होतो ज्यामुळे रक्तशुद्धी होवून रोगाचे मुळ कारणच नष्ट होते आणि दिर्घायुष्य लाभते. शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा झाल्यामुळे श्वासाची दुखणी आटोक्यात येतात. थकवा कुठल्या कुठे पळून जातो. 

३)झोप चांगली लागते कितीतरी लोक झोप लागत नसल्याने त्रस्त असतात. यालाच निद्रानाशाचा रोग जडला असे 

म्हणतात. त्यापासून सुटका होते. मनाची एकाग्रता वाढून मन शांत रहाते अर्थात चिडचिडेपणा नाहीसा होतो. शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती येते.  

४) जास्तीचे उष्मांक जळून चरबी कमी होते, आणि वजन घटते त्यामुळे शरीराची स्थुलता, जाडी कमी होते. समाजात वावरताना, "भीक नको पण कुत्रे आवर." म्हणण्याची वेळ आपल्यावर येते. 

शरीराच्या जाडीमुळे आपण लोकांसाठी कायमच उपहासाचा विषय बनलेलो असतो.

५) आपले ह्रदय तहहयात सतत धडधडत असते, दर मिनिटास बाहत्तर वेळा ते अकुंचन प्रसरन पावत असते. शरीर पोषणासाठी रक्त पुरवठा करण्याचे अविरत काम ह्दयच तर करत असते. 

६) शरीरातील प्रत्येक अवयवांना कार्यशील ठेवण्यासाठी रक्ताचा पुरवठा रक्तवाहिन्याद्वारे होत असतो त्यावेळी या रक्तामध्ये कार्बन, निरनिराळे दुषीत घटक मिसळून रक्त अशुद्ध बनते. हेच अशुद्ध रक्त परत ह्रदयाकडे येते. तेथे श्वासाद्वारे फुफ्फुसात आलेला ऑक्सिजन रक्तात मिसळून रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया घडते. त्याचवेळी रक्तातील कार्बन, दुषीत घटक उच्छवासाद्वारे बाहेर फेकले जातात आणि तेच रक्त शुद्ध म्हणजे ताजे तवाने बनून आपणही ताजे तवाने बनतो. 

यालाच रक्ताभिसरण म्हणतात. चालण्याच्या व्यायामामुळे रक्ताभिसरण कार्यक्षमतेने होते. हा श्वासोच्छवास सातत्याने नियमित चालू असतो जर का तो बंद झाला तर माणसाचे आयुष्य संपलेच म्हणून समजा.

७) सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायला गेल्यास सूर्य तुम्हाला मोफच 'ड' जीवनसत्त्वाचा पुरवठा करत असतो त्यामुळे आपली हाडे बळकट, मजबूत बणतात, गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी कुठल्या कुठे पळून जातात, संधीवाताचा त्रास कमी होतो.

८) चयापचयाची क्रिया सुधारते म्हणजे पचनशक्ती वाढते आणि भूक सपाटून लागते, अन्न पचन झाल्यामुळे मलबद्ध, बद्धकोष्ठ इत्यादी विकार नाहीसे होतात.

९) फुफ्फुसाची क्षमता वाढल्यामुळे आपली कार्यक्षमता वाढते मग कठीण कामही सहजसाध्य होते. मग काय आपली उत्पादक क्षमता वाढून उत्पन्नही वाढते त्यामुळे आपली आर्थिक सक्षमताही वाढते.

१०) समुहाने फिरत असालच तर चालतांना बोलत जाण्याऐवजी झपाझप चालत जा आणि एका ठिकाणी बसून हास्यविनोद करा खूप खळखळून हसा. हसण्यामुळे फुफ्फुसालाही चांगला व्यायाम होऊन श्वसनाचे विकार दूर होतात. हास्यविनोदामुळे नैराश्य दूर होते, परस्पर संवाद साधला जाऊन परस्पर नात्यामध्ये जवळीक, आपुलकी निर्माण होते. हीच नाती संकटकाळी धाऊन येतात. माणसाचं हसणंच हरवून गेलंय म्हणूनच हास्यक्लब स्थापन करण्याची वेळ आली आहे।

 

 ११) लवकर उठून फिरायला जाण्याचे किती म्हणून फायदे सांगावेत, ह्रदयरोग, मधुमेह, रक्तदाब अशी भलीमोठी यादीच सांगता येईल.

चुकीच्या पद्धतीने चालले तर फायद्याबरोबरच कांही दुष्परिणामांनाही सामोरे जायची वेळ येऊ शकते. "व्यक्ती तितक्या पृकृती" याची प्रचिती सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांकडे पहातांनाही येत असतेच. 

१) चालतांना कुणाचातरी प्रभाव मानगुटीवर घेवूनच बरेचजण फिरत असतात, त्याची ही कांही नमुनादाखल उदाहरणे,

एका किंवा दोन्हीही बजूला झुकत झुकत, डुलत डुलत चालणे. वेगाने चालण्याच्या हेतूने पाठीतून पुढे झुकत भरभर चालणे, यामुळे 

कमरेतील, मानेतील मणक्यावर ताण पडून पुढेचालून मणक्यामधील कुर्चा झीजते व कमरदुखीचा, मानदुखीचा (Spondylitis) त्रास उद्भवू शकतो. 

२) गुडघ्यातील, घोट्यातील सांध्यावर ताण पडून गुडघेदुखीचा त्रास अकाली सुरू होवू शकतो, त्यामुळे दवाखाण्याचा फेरा तर पाठीमागे लागतोच, शारीरिक वेदनेलाही बळी पडावं लागतं, वेळ पैसा वाया जातो तो तर वेगळाच.

२) गप्पा मारत चालणे, उदाहरणार्थ बायकांना घरी निवांतपणे बोलायला वेळच नसतो, त्यांना तरी चुकीचे कसे म्हणावे. पुरुषप्रधान संस्कृतीखाली आणखीही त्या दबूनच आहेत. घरात मोकळेपणाने बोलता येत नसल्याने मग फिरतांना उणीदुणी, उखाळ्या-पाखाळ्या काढत फिरण्याच्या मुख्य उद्देशाकडे दुर्लक्ष होते. आपण चालत असतांना शरीरामध्ये उर्जा निर्माण होत असते ती बोलण्यामुळे शरीरात साठण्या ऐवजी नष्ट होत जाते आणि चालण्याच्या व्यायामाचा व्हावा तसा फायदा होत नाही.

प्रभात समयी नियमितपणे तासभर चालण्यासारखा सोपा आणि बीनखर्ची दुसरा व्यायाम नाही, खात्रीपूर्वक सांगतो व्यायामशाळेत ("geam") जायचीही गरज नाही. जीमच्या कितीतरी पट फायदा सकाळी झपाझप चालण्यामुळे होतो.

मग काय करा निश्चय आणि उद्या सकाळीच फिरायला निघा.

Sunday 28 April 2019

निरोगी जीवन शैली.


     समाजामध्ये जेंव्हा आपण वावरतो त्यावेळी लक्षात येते की आसपास निरोगी माणसा पेक्षा कोणी ना कोणी डोक्यावर कुठलातरी आजार घेवूनच वावरत असतो. रक्तदाब, ह्रदय विकार, मधुमेह, शरीराची न पेलवणारी जाडी, ज्यामुळे गुडघेदुखीने त्रस्त, कमरेच्या मानेच्या मनक्यातील विकारामुळे कमरेला आणि गळ्याला पट्टा (ज्याला बेल्ट असं सुंदर नाव दिलेलं) असे कितीतरी आजार सांगता येतील. असं का होतं, आपण आपली जीवनशैली, जीवनपद्धती, जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन, अधुनिक जीवनपद्धती या गोंडस नावाने जगतात. असं का होतंय, ही वेळ आपल्यावर कोणी आणली या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलो तर एक आहे प्रदुषित वातावरण, दुसरं आहे माणसाच्या मनावरील ताणतणाव. याला कारणीभूत कोण आहे तर तो एकमेव मनुष्य प्राणीच.

आपल्या आरोग्यदायी, सुखी, आनंदी जगण्यासाठी दिवसातून किमान एक तास तरी काढू शकत नसाल तर कुरकुरत, चिडत चरफडत, देवाला दुषणे लावत आयुष्यभर जगण्याचा पर्याय निवडावा. जर आयुरारोग्य, सुख, आनंद आपल्या वाट्याला यावा असं मनापासून वाटत असेल तर स्वत:साठी आपण वेळ द्यायलाच हवा. प्रभातफेरी अर्थात सूर्योदयापूर्वी फिरने, योगासने, प्राणायाम यासाठी वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे. 

आपल्या आगोदरची पीढी ऐंशी नव्वदीपर्यंतच्या आयुष्यात एक सुद्धा गोळी किंवा ईंजेक्शनही घ्यावे लागले नाही असे अभिमानाने सांगायची. त्याचं एक कारण आहे, त्यावेळी त्यांच्या वाट्याला आजच्या सारखे तणावग्रस्त, वैफल्यग्रस्त जगणं मुळीच नसे, शुद्ध पाणी, शुद्ध हवा मुबलक असायची. निसर्ग भरभरून देत असतो निसर्गाप्रती तो कृतज्ञता बाळगून असायचा. दिवसभर काबाडकष्ट करून रात्री आठ वाजताच शांतपणे झोप लागे. या उलट आजची पिढी मात्र चाळीसीच्या आतंच मधुमेह, रक्तदाब, ह्रदयरोग, इत्यादी असाध्य रोगांना बळी पडत चालली आहे औषधे ही त्यांच्या अन्नाचा एक भागच बनली आहेत. कारण निसर्गाप्रती तो कृतघ्न झाला. बेसुमार वृक्षतोड करून अखंड ऑक्सिजन पुरवठा करणारे नैसर्गिक एअर कुलर (AC) तोडून फोडून उध्वस्त केले. सध्या त्याला शुद्ध पाण्यासाठी बाटलीबंद विकतचे पाणी (Minrai watar) प्यावे लागते. ऑक्सिजनची तीच अवस्था होणे फार काही दूर नाही, ऑक्सिजनच्या नळकांड्यांचं पाठीवर ओझं लादूनच त्याला घराबाहेर पडावे लागणार आहे! भौतिक सुखसुविधांसाठी नैसर्गिक जंगले तोडून सिमेंट कॉंक्रीटची जंगले उभी केली. ज्याचा दुष्परिणाम म्हणून आवर्षण, दुष्काळाला तोंड देऊ लागला. पर्यावरणाचे संतुलन ढासळत निरनिराळ्या रोगांच्या बळी पडू लागला. भौतिक मोठमोठे कारखाने उभारले, त्यांच्या चिमण्या कार्बन ओकू लागल्या, त्यांनी  वातावरणातील ऑक्सिजन हद्दपार केला आणि कार्बनडाय ऑक्साईडने श्र्रुष्टिचा जीव गुदमरून गेला आहे!

अपेक्षांच्या ओझ्याखाली नाहक स्वतःला गाडून घेत, अकारण ताण-तणावाला बळी पडत आहे. माहितीच्या महाजालात (Internet) अडकून माणुस माणसापासून, नात्यापासून दुरावत चालला आहे,


त्यामुळेच की काय तो एकलकोंडा बणत चालला आहे, सुखदुःखात सोबत रहाणारी माणसं कुठे तरी दूर सोडून तो जगण्याच्या प्रवासाला


निघाला आहे. आपेक्षांचं ओझं भिरकावून देणे त्याला जमत नाही.


अपेक्षा या पूर्णपणे कधीच सफल होत नसतात हे माहित असूनही, आपण मृगजळाच्या पाठीमागे धावत सुटतो, तृष्णा तृप्त तर होत नाहीतंंच परंतू धाप लागून आपलेच उर फोडून घेत आहोत.


त्यामुळे होतो अपेक्षाभंग, अपेक्षाभंगाचं कारण तरी काय असावं,


हार-जीत, शल्य, दु:ख पचवण्याची ताकतच माणसात उरलेली नाही यश, प्रसिद्धी, धन-संपत्ती विनासायास आणि मनाजोगती मीळत नाही म्हणून मन:शांती ढळून तो वैफल्य ग्रस्त झाला आहे, नैराश्य, चीडचीड, संताप आणि मग जीवच नकोसा होनं सर्वसामान्य झालं आहे, आयुष्याला कंटाळून बऱ्याचदा तो आत्महत्या सारख्या आत्मघातकी नीर्णयाला बळी पडतो आहे.

हे कुठे थांबणार की नाही, यावर कांही उपाय आहे की नाही?


हो आहे ना निश्चितच, त्यासाठी चंचल मन स्थीर करायला हवं, अपेक्षांचं ओझं भिरकावून द्यायला हवं, हे सहजासहजी होत नसते, त्यासाठी हवी साधना, साधना साधना म्हणजे काय हो?.ती कांही डोंगर-दऱ्यात, पर्वतावर जावून करण्याची आवश्यकता नसते. आपण  वेळेचं कारण देतो,  "आहो आम्हाला वेळच मिळत नाही हो!" मात्र आपल्याला मोबाईलवर chating साठी भरपूर वेळ असतो, तीथे रात्र रात्र गेली तरीही चालते, टीव्ही समोर तासंतास घालवतो, नोकरी धंद्यासाठी, कुटुंबासाठी दिवसभर राब राब राबत असतो, मग स्वतःला याच कामाच्या तंदुरुस्तीसाठी दिवसभरात किमान एक तास तरी देऊ शकत नाही?

नाही पटंत...

सकाळी लवकर उठून निसर्गाच्या सानिध्यात प्रभातफेरीसाठी (अर्थात, Morning walk) एक तास देणं काहींच अवघड नसतं त्यासाठी हवा मनोनिग्रह! घरात सुद्धा ध्यानधारणा शक्य असते. दिवसभरात तास दीडतास योगासने, प्राणायामासाठी एखादा तास वेळ काढणे तरी कुठे अशक्यातील बाब आहे. मात्र त्यासाठी हवा मनोनीग्रह आणि निर्धार,


तो तर आपणच करणार, हो की नाही?

शांत आणि सुखी जीवनासाठी अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या निकडीच्या गरजांबरोबरच योग, प्राणायाम, व्यायाम, ही पाचवी गरज ठरली आहे.


अजूनही वेळ गेलेली नाही, फार उशीर झालेला परवडणारा नसेल निश्चितच, वेळ कोणी दुसरे देणार नाही, म्हणून काढा वेळ आपणच आपल्यासाठी.