Sunday 28 April 2019

निरोगी जीवन शैली.


     समाजामध्ये जेंव्हा आपण वावरतो त्यावेळी लक्षात येते की आसपास निरोगी माणसा पेक्षा कोणी ना कोणी डोक्यावर कुठलातरी आजार घेवूनच वावरत असतो. रक्तदाब, ह्रदय विकार, मधुमेह, शरीराची न पेलवणारी जाडी, ज्यामुळे गुडघेदुखीने त्रस्त, कमरेच्या मानेच्या मनक्यातील विकारामुळे कमरेला आणि गळ्याला पट्टा (ज्याला बेल्ट असं सुंदर नाव दिलेलं) असे कितीतरी आजार सांगता येतील. असं का होतं, आपण आपली जीवनशैली, जीवनपद्धती, जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन, अधुनिक जीवनपद्धती या गोंडस नावाने जगतात. असं का होतंय, ही वेळ आपल्यावर कोणी आणली या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलो तर एक आहे प्रदुषित वातावरण, दुसरं आहे माणसाच्या मनावरील ताणतणाव. याला कारणीभूत कोण आहे तर तो एकमेव मनुष्य प्राणीच.

आपल्या आरोग्यदायी, सुखी, आनंदी जगण्यासाठी दिवसातून किमान एक तास तरी काढू शकत नसाल तर कुरकुरत, चिडत चरफडत, देवाला दुषणे लावत आयुष्यभर जगण्याचा पर्याय निवडावा. जर आयुरारोग्य, सुख, आनंद आपल्या वाट्याला यावा असं मनापासून वाटत असेल तर स्वत:साठी आपण वेळ द्यायलाच हवा. प्रभातफेरी अर्थात सूर्योदयापूर्वी फिरने, योगासने, प्राणायाम यासाठी वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे. 

आपल्या आगोदरची पीढी ऐंशी नव्वदीपर्यंतच्या आयुष्यात एक सुद्धा गोळी किंवा ईंजेक्शनही घ्यावे लागले नाही असे अभिमानाने सांगायची. त्याचं एक कारण आहे, त्यावेळी त्यांच्या वाट्याला आजच्या सारखे तणावग्रस्त, वैफल्यग्रस्त जगणं मुळीच नसे, शुद्ध पाणी, शुद्ध हवा मुबलक असायची. निसर्ग भरभरून देत असतो निसर्गाप्रती तो कृतज्ञता बाळगून असायचा. दिवसभर काबाडकष्ट करून रात्री आठ वाजताच शांतपणे झोप लागे. या उलट आजची पिढी मात्र चाळीसीच्या आतंच मधुमेह, रक्तदाब, ह्रदयरोग, इत्यादी असाध्य रोगांना बळी पडत चालली आहे औषधे ही त्यांच्या अन्नाचा एक भागच बनली आहेत. कारण निसर्गाप्रती तो कृतघ्न झाला. बेसुमार वृक्षतोड करून अखंड ऑक्सिजन पुरवठा करणारे नैसर्गिक एअर कुलर (AC) तोडून फोडून उध्वस्त केले. सध्या त्याला शुद्ध पाण्यासाठी बाटलीबंद विकतचे पाणी (Minrai watar) प्यावे लागते. ऑक्सिजनची तीच अवस्था होणे फार काही दूर नाही, ऑक्सिजनच्या नळकांड्यांचं पाठीवर ओझं लादूनच त्याला घराबाहेर पडावे लागणार आहे! भौतिक सुखसुविधांसाठी नैसर्गिक जंगले तोडून सिमेंट कॉंक्रीटची जंगले उभी केली. ज्याचा दुष्परिणाम म्हणून आवर्षण, दुष्काळाला तोंड देऊ लागला. पर्यावरणाचे संतुलन ढासळत निरनिराळ्या रोगांच्या बळी पडू लागला. भौतिक मोठमोठे कारखाने उभारले, त्यांच्या चिमण्या कार्बन ओकू लागल्या, त्यांनी  वातावरणातील ऑक्सिजन हद्दपार केला आणि कार्बनडाय ऑक्साईडने श्र्रुष्टिचा जीव गुदमरून गेला आहे!

अपेक्षांच्या ओझ्याखाली नाहक स्वतःला गाडून घेत, अकारण ताण-तणावाला बळी पडत आहे. माहितीच्या महाजालात (Internet) अडकून माणुस माणसापासून, नात्यापासून दुरावत चालला आहे,


त्यामुळेच की काय तो एकलकोंडा बणत चालला आहे, सुखदुःखात सोबत रहाणारी माणसं कुठे तरी दूर सोडून तो जगण्याच्या प्रवासाला


निघाला आहे. आपेक्षांचं ओझं भिरकावून देणे त्याला जमत नाही.


अपेक्षा या पूर्णपणे कधीच सफल होत नसतात हे माहित असूनही, आपण मृगजळाच्या पाठीमागे धावत सुटतो, तृष्णा तृप्त तर होत नाहीतंंच परंतू धाप लागून आपलेच उर फोडून घेत आहोत.


त्यामुळे होतो अपेक्षाभंग, अपेक्षाभंगाचं कारण तरी काय असावं,


हार-जीत, शल्य, दु:ख पचवण्याची ताकतच माणसात उरलेली नाही यश, प्रसिद्धी, धन-संपत्ती विनासायास आणि मनाजोगती मीळत नाही म्हणून मन:शांती ढळून तो वैफल्य ग्रस्त झाला आहे, नैराश्य, चीडचीड, संताप आणि मग जीवच नकोसा होनं सर्वसामान्य झालं आहे, आयुष्याला कंटाळून बऱ्याचदा तो आत्महत्या सारख्या आत्मघातकी नीर्णयाला बळी पडतो आहे.

हे कुठे थांबणार की नाही, यावर कांही उपाय आहे की नाही?


हो आहे ना निश्चितच, त्यासाठी चंचल मन स्थीर करायला हवं, अपेक्षांचं ओझं भिरकावून द्यायला हवं, हे सहजासहजी होत नसते, त्यासाठी हवी साधना, साधना साधना म्हणजे काय हो?.ती कांही डोंगर-दऱ्यात, पर्वतावर जावून करण्याची आवश्यकता नसते. आपण  वेळेचं कारण देतो,  "आहो आम्हाला वेळच मिळत नाही हो!" मात्र आपल्याला मोबाईलवर chating साठी भरपूर वेळ असतो, तीथे रात्र रात्र गेली तरीही चालते, टीव्ही समोर तासंतास घालवतो, नोकरी धंद्यासाठी, कुटुंबासाठी दिवसभर राब राब राबत असतो, मग स्वतःला याच कामाच्या तंदुरुस्तीसाठी दिवसभरात किमान एक तास तरी देऊ शकत नाही?

नाही पटंत...

सकाळी लवकर उठून निसर्गाच्या सानिध्यात प्रभातफेरीसाठी (अर्थात, Morning walk) एक तास देणं काहींच अवघड नसतं त्यासाठी हवा मनोनिग्रह! घरात सुद्धा ध्यानधारणा शक्य असते. दिवसभरात तास दीडतास योगासने, प्राणायामासाठी एखादा तास वेळ काढणे तरी कुठे अशक्यातील बाब आहे. मात्र त्यासाठी हवा मनोनीग्रह आणि निर्धार,


तो तर आपणच करणार, हो की नाही?

शांत आणि सुखी जीवनासाठी अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या निकडीच्या गरजांबरोबरच योग, प्राणायाम, व्यायाम, ही पाचवी गरज ठरली आहे.


अजूनही वेळ गेलेली नाही, फार उशीर झालेला परवडणारा नसेल निश्चितच, वेळ कोणी दुसरे देणार नाही, म्हणून काढा वेळ आपणच आपल्यासाठी.


No comments:

Post a Comment